Thursday, August 16, 2018

Allopathic Science Reality (ऑलोपॅथिक मेडिकल सायन्स ची वास्तविकता)

                                                                                                                                                                                                                                                                                संग्रहित                                            ऑलोपॅथिक मेडिकल  सायन्स  ची  वास्तविकता ---

1) ऑलोपॅथिकक ने  इतकी उन्नती केली आहे की  पृथ्वी वर  क्वचितच एखादा  निरोगी व्यक्ती पहावयास मिळेल.
2) हर बिमारी के लिये गोली  नहीं है, मगर हर गोली एक ना एक बिमारी जरूर पैदा कर रही है l
3) प्रत्येक कुटुंबातील एक न एक सदस्य कोणत्यातरी व्याधी ने   (शारीरिक या मानसिक ) ग्रस्त आहे.
4)  संपूर्ण मेडिकल व्यवस्था भयानक भ्रस्टाचाराने ग्रस्त झालेली आहे.  अनावश्यक रक्त-लघवी च्या  तपासण्या, xray, कॅट स्कॅन, MRI, अनावश्यक  ऑपेरेशन चे एक महाभयंकर जाळे  असे पसरवलेलं आहे की  लोक काही समजण्याआधीच या  भ्रष्ट व्यवस्थेला बळी पडत आहेत.
5) पूर्ण विश्वातील मानवाला  व्याधीनी  ग्रस्त करून  मृत्यूपर्यंत  नेण्याचे सर्वाधिक श्रेय ऑलोपॅथीला जाते.  एके  काळी ऑलोपॅथी मनुष्यप्राण्यासाठी वरदान सिद्ध झाली होती.  आज मात्र ऑलोपॅथीमुळे संपूर्ण मानवजातीचे अस्तित्वच धोक्यात आलं  आहे.
6)ADR  म्हणजे अडवर्स ड्रग रिअक्शन -- संपूर्ण  जगामध्ये  मानवी मृत्यू चे सर्वात मोठे कारण ADR आहे.  आपण ज्या ऑलोपॅथिक औषिधी घेतो त्यांचा आपल्या शरीरावर प्रतिकूल प्रभाव पडतो व शरीर हळू हळू रुग्ण होत जाते.
7) दिवसेंदिवस वाढत जाणारी आजारी माणसांची व मोठमोठ्या हॉस्पिटल ची संख्या हे कश्याचे द्योतक आहे?
8) सर्व प्रगत देशांमध्ये जिथे सर्वाधिक सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल  आहेत, आय सी सी यु युनिट्स आहेत,
मल्टीस्पेशिअलिटी हॉस्पिटल आहेत, नेओनेटलॉजि युनिट्स आहेत तिथे लोकांचे आरोग्य सर्वाधिक खराब आहे असे UNO 2007 च्या सर्वेक्षनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
9) कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या स्टॅटिन्स या औषधामुळे दरवर्षी 11लाख लोकांना मधुमेह  (diabetis)होतो.
10) टाइम्स ऑफ इंडिया च्या एका रिपोर्ट मध्ये असे नमूद केले आहे की  भारतात पोलीस व्यवस्थेनंतर सर्वात महाभ्रस्ट व्यावस्था ही  आजची मेडिकल व्यवस्था आहे.
11) ऑलोपॅथिक चिकित्सा प्रणालीवर मोठ्या औषधी कंपन्यांचे घनिस्ट   जाळे  असून औषधांबद्दल चुकीची माहिती डॉक्टरांना देऊन त्यांना दिग्भ्रमीत केले जाते व अनेक चुकीची औषधं रुग्णांच्या माथी मारली जातात. जगातील अनेक प्रगत देशांमध्ये प्रतिबंधित औषधं आपल्या देशात मुक्तहस्ते   उपयोगात आणली जातात.
12) न्यू  इंग्लंड जरनल ऑफ मेडिसिन हे ऑलिपॅथीक चिकित्सा जगतातील सर्वाधिक मान्यता प्राप्त पत्रिका असून ह्या पत्रिकेच्या मुख्य संपादिका मार्सिया एंजेलिस आहेत. त्या अत्यन्त सन्मानित ऑलोपॅथिक डॉक्टर असून अमेरिकन नागरिक आहेत.  त्यांनी आपल्या ' द ट्रुथ अबाऊट ड्रग कंपनीज ' या पुस्तकात भ्रस्ट औषधी कंपन्यांची कुकृत्ये व त्यामुळे
भरडला जाणारा जगभरातील रुग्ण व सामान्य माणूस ह्या  बद्दल पुराव्यानिशी वाभाडे काढले आहेत.
13) आणखी एका पुस्तकाने संपूर्ण जगात खळबळ उडूवून दिली आहे त्या पुस्तकाचे नाव आहे "ओव्हर डोस अमेरिका " या पुस्तकाचे लेखक डॉक्टर जॉन अब्राहम या सुप्रसिद्ध अमेरिकन लेखकाने संपूर्ण जगाला पुराव्यानिशी हे दाखवून दिले आहे की अमेरिकेसहित संपूर्ण जगाचे स्वास्थ्य ऑलोपॅथिक औषधांमुळे कसे खालावत चालले आहे.  लेखक हे सुप्रसिद्ध हॉर्वर्ड स्कूल ऑफ मेडिसिन चे मानद सदस्य आहेत.
14) जगभरातील लोकांचे आजार वाढण्या मागे ऑलिपॅथीक चिकित्सा व्यवस्थेचे घोर अपयश कारणीभूत आहे. ज्या अमेरिकेला चिकित्सा विज्ञानाचे मक्का -मदिना म्हटले जाते तिथेही आरोग्याच्या बाबतीत होत असलेली घोर दुर्दशा हे कश्याचे द्योतक आहे.
15) अँटिडिप्रेसंट औषधी, antiboitics, कोलेस्टेरॉल च्या औषधी या मध्ये साक्षी बदलवून आकड्यांचा भयंकर उलट फेर करून सर्व जगाला दिग्भ्रमीत केले आहे.
16) यानंतर आणखी एका पुस्तकाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे त्या पुस्तकाचे नाव आहे "DEATH बाय PRISCRIPTION"
या पुस्तकाचे लेखक सुविख्यात अमेरिकन डॉक्टर असून त्यांचे नाव DOCTOR RESTRAIN हे आहेत.  डॉक्टर्स कश्या प्रकारे आपल्या पेशंट्सना  (रुग्णांना) मृत्यू पर्यंत पाहोचवत आहेत याचे संपूर्ण पुरावे नमूद केलेले आहेत. जसे न्यायाधीश आपल्या निर्णयाद्वारे  आरोपींना फासावर चढवतो तशीच प्रक्रिया ऑलोपॅथिक चिकित्सा विज्ञानाद्वारा घडत आहे.
17)आज भारतासहित संपूर्ण जगामध्ये मृत्यूचे सर्वात मोठे कारण हार्ट अटॅक अथवा अपघात नसून उपचारादरम्यान दिल्या जाणाऱ्या ऑलोपॅथिक औषधी आहेत हे Dr.Restrain यांनी सप्रमाण  दाखवून दिले आहे....

 डॉक्टर व हॉस्पिटल हे समाजाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत ही कल्पनाच मुळी मूर्खपणाची आहे. जोपर्यंत  प्रत्येक  व्यक्ती स्वतः च्या आरोग्याची काळजी व जबाबदारी स्वतः घेणार नाही, तोपर्यंत डॉक्टर व हॉस्पिटल काहीच  करू शकणार नाहीत. इतर कोणत्याही करणापेक्षा औषधांच्या दुष्परिणामांनी  मरणारांची संख्या पाचपट जास्त आहे.
-Dr. B. M. Hegde (पद्मभूषण )MD,FRCP(London)
19) ऑलोपॅथिक चिकित्सा विज्ञानापेक्षा आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, ऍक्युप्रेशर  Homiopathy ई. चिकित्सापद्धती अधिक श्रेष्ठ आहेत. टेकनॉलॉजि चा उपयोग करून ऑलोपॅथीला वरचढ सिद्ध करणे ही समाजाची अक्षम्य दिशाभूल आहे.
20) लोकांना असे वाटते की ऑलोपॅथिक चिकित्साविज्ञान हे ज्ञान व प्रक्रियांचे सुव्यवस्थित क्षेत्र आहे. परंतु हा केवळ  एक भ्रम आहे. हे एक अत्यंत अपूर्ण व अनेक दोषांनी युक्त विज्ञान आहे. ऑपेरेशन व उपचारा दरम्यान मानवी शरीरात घडणाऱ्या जैव रासायनिक प्रक्रिया इतक्या धोकादायक व अनिश्चित असतात की त्यामुळे मृत्यू झाल्यास आश्चर्य वाटायला नको. -डॉ. अतुल गावंडे (HOD  बोस्टन युनिव्हर्सिटी अमेरिका,  सर्जरी डिपार्टमेंट )
 21)हेल्थ चेकअप च्या नावाने एक जबरदस्त व्यापार व भ्रष्ट व्यवस्था अस्तित्वात आहे. लोकांना असं वाटत असेल की पृथ्वी वर जीवंत राहण्यासाठी ऑलोपॅथिक चिकित्सा /औषधी /रक्त -लघवी तपासण्या व हायटेक सर्जरी व टेक्नोलोंजि आहे तर हे साफ चुकीचे आहे.  डॉ. हेगडे येथे नमूद करतात की देवाची कृपा आहे की हे ऑलोपॅथिक चिकित्सा विज्ञान 100-150वर्ष  जुने आहे. त्यामुळे मानव जात अजून पृथ्वी वर जीवंत आहे.
22) मानवी प्रतिकार क्षमता किंवा आजार ठीक करण्याची अंगभूत क्षमता यांवर ऑलोपॅथिक डॉक्टरांचा विश्वास नाही. चिकित्सा जगतातील व्यापारीकरणामुळे लोकांचा विश्वास डॉक्टरांवरून उडत चाललेला आहे. वेळीच पैसा व चिकित्सा जर वेगळी केली गेली नाही तर समूळ मानवजात धोक्यात येईल इतका हा जीवघेणा उद्योग झालेला आहे. टेक्नॉलॉजिमुळे चिकित्सेला बाजाराचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
23) हृदयरोग व कॅन्सर यामध्ये सर्वाधिक टेक्नोलोंजि चा वापर केला जातो. हे दोन विभाग प्रचंड पैसा  कमविण्याचे साधन बनले आहेत. बायपास, कॅन्सर मध्ये, अँपेंडिक्स, मणक्याचे ऑपेरेशन, सिझेरिअन, गर्भाशय काढण्याचे, कृत्रिम गुडघेरोपनाचे  ऑपरेशन हे गरज नसतांना सर्रास केले जाणारे व त्याद्वारे प्रचंड पैसा उकळण्याचे साधन बनले आहे.
24) ऑलोपॅथिक चिकित्सा पद्धती निदान (dignosis) च्या बाबतीत अचुक आहे असे म्हटले जाते परंतु हा सुद्धा एक भ्रम आहे.  त्यात चलाखी, कृत्रिमपणा अधिक असतो. Dr. Jecob kuriyan यांनी ही निदानाची प्रक्रिया अचूक असूच शकत नाही हे आपल्या पुस्तकात सिद्ध केले आहे.
25)संपूर्ण देशवासीयांपुढे या अतिशय भ्रष्ट ऑलोपॅथिक चिकित्सा व्यवस्थेशी कसे लढावे हा यक्ष प्रश्न आहे. देशातील सर्व कायदे डॉक्टर व हॉस्पिटल ना संरक्षण देतात. रुग्णांच्या अगतिकतेचा व अज्ञानाचा फायदा घेऊन सर्व प्रकारचे भ्रष्ट्र आचरण करणाऱ्या व साळसूद पणे समाजामध्ये राहणाऱ्या या व्यवस्थेचे काय करावे हा खरा प्रश्न आहे.
 26)टाइम्स ऑफ इंडिया च्या एका संपादकीय लेखामध्ये 29/09/2007 रोजी डॉक्टर इन मेडिसिन या मथळ्याखाली असे म्हटले आहे की पोलीस व्यवस्थेनंतर सर्वात महाभ्रष्ट व्यवस्था कोणती  असेल तर ती आपल्या देशातील आधुनिक चिकित्सा व मेडिकल व्यवस्था आहे. आता इतक्या वर्षात ती बहुधा क्रमांक एक ची झाली असेल यात शंका नाही.
समाजातील सर्वांना याचा अनुभव आलेला असूनही सर्व सुज्ञ लोक व शासन याबाबत आत्मघातकी मौन बाळगून आहेत.
27) अनावश्यक रक्त -लघवी तपासणी, xray, सोनोग्राफी, कॅट स्कॅन, MRI, एन्डोस्कोपी अँजिओग्राफी ई.  अनेक तपासण्या करण्यासाठी रुग्णांना बाध्य केले जाते. यापैकी 90% तपासण्यांची रुग्णांना गरज नसते.  डॉक्टर स्वतः आपल्या अनुभव व  कौश्यल्याच्या आधारे योग्य निदान करू शकतात. जे शेकडो तपासण्यांपेक्षा जास्त अचूक असू शकते. या तपासण्यांमागे 50% पर्यंत कमिशन मिळते हे अमीर खानने सत्य मेव जयते या टीव्ही कार्यक्रमात जगजाहीर केले आहे. यात काही अपवाद नसतील असे नाही.
 28) अनावश्यक व्हॅक्सिनेशन चा धंदाही फार जोमात आहे. लसीकरण करतांना BCG, POLIO, TRIPLE, MMR, MISEALS, TYPHOID ई. लसी वगळता अनेक लसी अनावश्यक असून या  लसींची विश्वासाहार्यता आपल्या देशात अगदीच कमी आहे.  औषधी कंपन्या लसीकरणाच्या नावाने अब्जावधी रुपयांचा नफा कमवितात. मेडिकल सायन्स च्या इतिहासात लाखो लोकांचा बळी या अनावश्यक लसीकरणामुळे गेला आहे. लसीकरणामुळे आजार जातात हा भ्रम आहे.
29) औषधी कंपन्या आपली औषधं लिहावी म्हणून डॉक्टरांना मोठ्या प्रमाणात रोख, भेटवस्तू, विदेश दौरे प्रायोजित करतात. रुग्णांना जास्तीत जास्त औषधं लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. अनावश्यक औषधांच्या दुष्प्रवामुळे रुग्णाच्या शरीरावर घातक दुष्परिणाम होऊन  रुग्णांचा जीव व पैसा दोन्हीवर गदा येते. रुग्ण मात्र याबद्दल अनभिज्ञच राहतात.
30) असाच भ्रष्टाचार मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल नी अवलंबलेला असून अनावश्यक ऑपरेशन ची मालिकाच आहे.  यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्यामुळे अनेक ऑपरेशन चा दुरुपयोग सर्रास होतांना दिसून येतो. खुप कमाई असल्यामुळे अनेक शहरांत सुपरस्पेसिलिटी व मुलतीस्पेसिलिटी हॉस्पिटल ची साखळीच निर्माण होत आहे. मोठी कार्पोरेट घराणी आता या व्यवसायात उतरली आहेत.
31) रुग्णाचा आजार किती गंभीर आहे हे रुग्णाच्या नातेवाईकांना अतिशय चांगल्या पद्धतीने पटवून दिले जाते(तो तसा नसतांना). त्याला विचार करायला वेळही मिळू न देता महागडी ऑपरेशन करायला भाग पाडले जाते
32) असे अनावश्यक ऑपरेशन करतांना किंवा उपचार करतांना रुग्ण दगावला अथवा अधिक गंभीर झाला तर हॉस्पिटल कोणतीही जबाबदारी न घेता पॆसे मात्र पूर्ण वसुल करतात. अनेक वेळा असे दिसून आले आहे की सामान्य आजारांकरिता केलेल्या अनावश्यक  ऑपरेशन मुळे रुग्णाला जीव गमवावा लागला आहे.
 33) अशीच एक भयंकर समस्या या देशाला भेडसावत आहे. ती म्हणजे स्त्रीभ्रूणहत्या. भातासारख्या देशामध्ये ही बाब अतिशय लाजिरवाणी आहे. ऑलोपॅथिक डॉक्टरांच्या सभागाशिवाय हे पाप घडूच शकत नाही. संपूर्ण देशातील सामाजिक व्यवस्था वेगाने ढासळत आहे. स्त्री-पुरुष गुणोत्तर लक्षणीय घटत आहे. सरकारी कायदे, सर्वोच्च न्यायालय, सामाजिक संस्था व प्रत्यक्ष मा. पंतप्रधान यांनी गंभीर विधाने करूनही डॉक्टर थांबायला तयार नाहीत.
34)अनेक शासकीय योजनांमधून रुग्णांचे हजारो कोटी रुपये वसुल केले जातात. किडणीचोर  डॉक्टरांच्या कुकृत्यामुळे देशाला अनेक वेळा व्यथित व्हावे लागले आहे.  डॉक्टरांच्या निष्काळजी वर्तनामुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.
35) व्यवस्थेच्या मुळापर्यंत पसरलेला हा भ्रष्टाचार थांबवणे शासकीय यंत्रणेला शक्य नाही. कारण त्याच भ्ष्ट 
वृत्तीने ही यंत्रणाही किडलेली आहे. स्वतः चे स्वास्थ्य अबाधित राहील अशा आरोग्यदायी सवयी  सर्वांनी आत्मसात करायला हव्यात हेच याला चोख प्रत्युत्तर ठरेल.

No comments:

Post a Comment