Monday, August 05, 2019

NAAGA PANCHAMI ( नागपंचमी )

NAAGA PANCHAMI ( नागपंचमी )

श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण ‘नागपंचमी’चा ! या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरणे, कापणे वर्ज्य असते. या सर्व गोष्टींमागील इतिहास आणि शास्त्र या लेखातून आपण जाणून घेणार आहोत
१. तिथी  नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा 
केला जातो.
२. इतिहास     सर्पयज्ञ
२ अ. सर्पयज्ञ करणार्‍या जनमेजय राजानी  आस्तिक नावाच्या 
ऋषींनी प्रसन्न करून पुरोहित म्हणुन घेतले. इन्द्राय तक्षकाय 
स्वाहा उच्चारल्यावर सर्प तक्षक व इन्द्र सहित यज्ञात आहुति होणार इतक्यात इन्द्रानि आस्तिक ऋषिना प्रार्थना केल्यावर . जनमेजयाने सर्पयज्ञ थांबवला, तो दिवस पंचमीचा होता.

२ आ. ‘शेषनाग त्याच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो. तो पाताळात राहातो. त्याला सहस्र फणे आहेत. प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे. 
त्याची उत्पत्ती श्रीविष्णूच्या तमोगुणापासून झाली, असे म्हटले जाते. श्रीविष्णु प्रत्येक कल्पाच्या अंती महासागरात शेषासनावर शयन करतो. त्रेतायुगात श्रीविष्णूने रामाचा अवतार घेतला. तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. द्वापर आणि कली या युगांच्या संधीकाळात कृष्णाचा अवतार झाला. त्या वेळी शेष बलराम झाला.

२ इ. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.

२ ई. पाच युगांपूर्वी सत्येश्‍वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.

३. नागांचे प्रकार त्रिगुणांप्रमाणे नागांचे प्रमुख तीन प्रकार आहेत.

३ अ. तामसिक नाग हे नाग प्रामुख्याने काळ्या रंगाचे असून ते पाताळातील नागलोकात निवास करतात. मोठ्या वाईट शक्ती या नागांचा सूक्ष्म युद्धामध्ये शत्रूवर विषप्रयोग करण्यासाठी शस्त्राप्रमाणे वापर करतात. पाताळातील नाग हे पृथ्वीवर नागांपेक्षा लक्ष पटींनी सामर्थ्यवान आणि सहस्र पटींनी विषारी असतात.

३ आ. राजसिक नाग हे नाग पृथ्वीवर वास करतात. नागयोनीमध्ये जन्म मिळाल्यामुळे या नागांचे आचरण सर्वसामान्य नागांप्रमाणे असते. ते काळे, निळसर, तपकिरी, चॉकलेटी आदी रंगांचे असतात.

३ इ. सात्त्विक नाग हे नाग दैवी असल्यामुळे ते शिवलोका जवळील दैवी नागलोकात वास करतात. त्यांचा रंग पिवळसर असतो आणि त्यांच्या मस्तकावर लाल किंवा निळ्या रंगाचा नागमणी असतो. सात्त्विक नाग हे पाताळातील नागांच्या तुलनेत लक्ष पटींनी सामर्थ्यवान असतात. सात्त्विक नागांना विविध देवतांनी धारण केले आहे. शिवाच्या गळ्यात वासुकी असतो. गणपतीच्या पोटाला वेटोळे घातलेला जागृत विश्‍वकुंडलीनीचे प्रतीक असणारा पिवळा नाग पद्मनाभ आहे. श्रीविष्णू शेषनागाच्या शय्येवर पहुडतो. सात्त्विक नाग सिद्ध आणि ऋषिमुनी यांच्या आधीन असतात. ते त्यांच्या आज्ञेचे पालन करतात. प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या आज्ञेने साधक आणि आश्रम यांचे वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण करण्यासाठी सनातनच्या विविध आश्रमांभोवती सूक्ष्मातून पिवळ्या नागांचे सैन्य तैनात आहे. पिवळे नाग उच्च देवतांचे उपासक असल्यामुळे त्यांच्याकडे दैवी बळ आहे. त्यामुळे त्यांना आशीर्वाद देण्याचे, म्हणजे संकल्पानुसार कार्य करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे.

४. नागांची उपास्य देवता शिव हा सर्व नागांचा अधिपति आहे. बहुतांश नाग शिवाचीच उपासना करतात. काही नाग विष्णूची, तर काही नाग श्रीगणेशाची उपासना करतात.

५. देवतांच्या श्रेणीतील नागांचे स्थान

५ अ. नागदेवता या गौण देवतांमध्ये गणल्या जातात.

५ आ. काही ठिकाणच्या स्थानदेवता म्हणूनही त्या कार्य करत असतात.

५ इ. नागदेवतांचे स्थान पिंपळाच्या किंवा वडाच्या वृक्षाखाली किंवा मोठ्या वारुळात असते.

५ ई. सातेरी देवीचा वास वारुळात असतो. देवीची सेवा करण्यासाठी आणि तिचे गण बनून कार्य करण्यासाठी सात्त्विक नाग वारुळात वास करतात.

५. उ. पूर्वज आणि नाग यांचा परस्परांशी असणारा संबंध भुवलोक आणि पितृलोक येथे अडकलेले पूर्वज बहुदा काळ्या नागांच्या रूपात वंशजांना दर्शन देतात. सात्त्विक पूर्वज पिवळ्या नागांच्या रूपात दर्शन आणि आशीर्वाद देतात. घर, संपत्ती आणि कुटुंबीय यांच्याविषयी पुष्कळ आसक्ती असणार्‍या पूर्वजांना पृथ्वीवर नागाच्या योनीत जन्म मिळतो. मनुष्य जन्मात इतरांना त्रास देऊन वाममार्गाने संपत्ती अर्जित केलेल्या पूर्वजांना पुढील जन्म पाताळातील काळ्या नागांच्या रूपाने मिळतो. देवकार्यात सहभागी असणारे आणि सज्जन प्रवृत्तीचे पूर्वज हे पितृलोकात निवास केल्यानंतर काही काळ शिवलोकाजवळील दैवी नागलोकात पिवळ्या नागांच्या रूपाने वास करतात.

६. कलियुगातील मनुष्याने नागांची स्थाने
असणारी नागबने नष्ट केल्यामुळे मनुष्याला नागांचा उपद्रव होणे कलियुगाच्या आरंभापर्यंत विविध ठिकाणच्या देवतांना त्यांचे स्वतंत्र स्थान दिले जायचे, उदा. स्थानदेवता, ग्रामदेवता, क्षेत्रपालदेवता इत्यादी. त्याप्रमाणे भारतातील प्रत्येक गावात नागांना रहाण्यासाठी नागबन होते. या ठिकाणी मोठमोठे दाट वृक्ष जवळ-जवळ असायचे आणि त्यांच्या बुंध्याच्या मुळाशी वारुळ असायचे. प्रत्येक गावातील नाग तेथे रहायचे. (अशी नागबने अजूनही कर्नाटक राज्यातील मुल्की, सुरतकल आदी ठिकाणी आपल्याला पहावयास मिळतात.) नागांना स्वतंत्र स्थान दिल्यामुळे ते मनुष्याला त्रास देत नसत आणि मनुष्य अन् त्याची संपत्ती यांचे रक्षण करायचे. विज्ञानयुगातील मानवाने भौतिक प्रगती करण्यासाठी गावोगावी असणारी नागबने नष्ट करून तेथे मोठमोठ्या इमारती बांधल्या. त्यामुळे मनुष्याला नागांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. केरळ राज्यातील अनेक ठिकाणी अशा प्रकारे नागबनांचा विध्वंस करून तेथे इमारती बांधल्यामुळे तेथील हिंदूंना नागदंश होणे, स्वप्नात नाग दिसणे, घरात सतत आजारपण असणे यांसारखे त्रास होतात,

७. नागपूजनाचे महत्त्व

७ अ. ‘नागांतील श्रेष्ठ जो ‘अनंत’ तोच मी’, अशी गीतेत (१०.२९) श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो.

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम् ।
शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं, कालियं तथा ।।

अर्थ : अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात. त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही.

७ आ. ‘नागामध्ये नागपंचमीच्या दिवसाविना इतर दिवशी तत्त्वे अप्रकट स्वरूपात कार्यरत असतात; मात्र नागपंचमीच्या दिवशी ती प्रकट स्वरूपात कार्यरत असल्यामुळे पूजकाला त्यांचा अधिक लाभ होतो. सध्या नाग उपलब्ध होत नसल्यामुळे स्त्रिया पाटावर हळदीने नऊ नागांच्या आकृत्या काढून त्यांचे पूजन करतात. मात्र नागपंचमीच्या दिवशी प्रत्यक्ष नागाचे पूजन करणे अधिक लाभदायक ठरते; कारण सजीव रूपात ईश्वरी तत्त्वे आकृष्ट करण्याची अधिक क्षमता असते.

७ इ. जगातील सर्व जीवजंतू जगाच्या कार्यासाठी पूरक आहेत. नागपंचमीला नागांच्या पूजेद्वारे ‘भगवंत त्यांच्याद्वारे कार्य करत आहे’, हा विशाल दृष्टीकोन शिकायचा आहे.’

८. नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचे महत्त्व सत्येश्‍वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्‍वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. ‘भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यांतून तारला जावो’, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला ७५ टक्के लाभ होतो आणि त्याचे रक्षण होते.

९. नवीन वस्त्रे आणि अलंकार घालण्याचे कारण
सत्येश्‍वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले. त्यातून सत्येश्‍वरी समाधानी झाली. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करतात.

१० मेंदी लावण्याचे महत्त्व नागराज सत्येश्वराच्या रूपात सत्यश्‍वेरीच्या पुढ्यात उभा राहिला. ‘तो निघून जाईल’, असे वाटून तिने त्याच्याकडून, म्हणजे नागराजाकडून तसे हातांवर वचन घेतले. ते वचन देतांना सत्येश्‍वरीच्या हातांवर वचनचिन्ह निर्माण झाले. त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातांवर मेंदी काढते.

११. झोका खेळण्याचे महत्त्व नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे शास्त्रोक्‍त पूजन केल्यानंतर आनंदाचे प्रतीक म्हणून स्त्रियांनी झोका खेळण्याची प्रथा परंपरांगत चालत आली आहे.

११. अ. नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्या मागील इतिहास पाच युगांपूर्वी सत्येश्‍वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नाग रूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. दुसर्‍या दिवशी सत्येश्‍वरीला नागराज दिसला नाही. तेव्हा ती रानात सैरावैरा भटकू लागली आणि शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्‍वराचे रूप प्रकट केले. तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. झोका खेळण्यामागील उद्देश असतो – जसा झोका वर जातो, तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो, तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःखे खाली जाऊ देत.

११. आ. महत्त्व वरील भाव ठेवून जेव्हा बहीण प्रत्येक विचार आणि कृती करते, तेव्हा भावाची ५ टक्के आध्यात्मिक आणि ३० टक्के व्यावहारिक उन्नती होते.

१२ नागपूजन - महत्व आणि पूजाविधी

१२ अ. नागाच्या पूजनाचे महत्त्व : शिवाने जेव्हा हलाहल विषाचे प्राशन केले तेव्हा त्याला साहाय्य करण्यासाठी नऊ नाग आले आणि त्यांनीही हलाहलाचा अंश प्राशन केला. त्यामुळे शिव नागांवर प्रसन्न झाले. नागांनी समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी ‘मनुष्य नेहमी नागांप्रती कृतज्ञ राहून तो नागांची पूजा करेल’, असा आशीर्वाद नागांना दिला. तेव्हापासून नऊ नाग मनुष्याला पूजनीय झाले. नऊ नाग हे नऊ प्रकारची पवित्रके (चैतन्यलहरी) ग्रहण करणारे घटक आहेत. त्यांच्या पूजनाने चैतन्यलहरींना धारण करणार्‍या समुहाचेच पूजन होते.

१२ आ. पूजनाचा विधी : या दिवशी गारुडी लोक नाग आणतात. त्याची पूजा करून त्याला दूध देतात. घरामध्ये स्वच्छ लाकडी पाटावर गंध, हळद आणि कुंकू यांच्या मिश्रणाने पाच फण्यांचा नाग काढावा किंवा रक्तचंदनाने नऊ नागांच्या आकृत्या काढाव्यात. काही ठिकाणी मातीचा नागही बनवून त्याचे पूजन करतात. नागाची पूजा करतांना अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या नऊ नागांची नावे घेऊन गंध, अक्षता आणि फुले वाहावीत. घरातील लोकांनी फुले, दूर्वा, लाह्या, हरभरे इत्यादी पदार्थ वाहावेत.

१२ इ. पूजनाची फलप्राप्ती : नऊ नागांचे पूजन केल्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होण्याचे संकट टळते.’

१३. नागपंचमी साजरी करतांना करावयाच्या प्रत्येक कृतीचा आध्यात्मिक लाभ

१३ अ. नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान केल्याने आनंद आणि चैतन्य यांच्यालहरी आकर्षित होतात.

१३ आ. झोका खेळल्याने क्षात्रभाव आणि भक्‍तीभाव वाढून त्यातून सात्त्विकतेच्या लहरी मिळतात.

१३ इ. उपवास केल्याने शक्‍ती वाढते आणि उपवासाचे फळ मिळते

१३ उ. ‘जी स्त्री नागाच्या आकृत्यांचे भावपूर्ण पूजन करते, तिला शक्‍तीतत्त्व प्राप्त होते.

१३ ऊ. या विधीमध्ये स्त्रियांनी नागांचे ‘भाऊ’ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते.

१३ ए. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे, म्हणजे नागदेवतेस प्रसन्न करून घेणे.

१३ ऐ. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे, म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे. त्यामुळे त्या दिवशी वातावरणात आलेल्या शिवलहरी आकृष्ट होऊन त्या जिवाला ३६४ दिवस उपयुक्‍त ठरतात.

१४. नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक साधिकेने करायची प्रार्थना नागपंचमीच्या दिवशी जी बहीण भावाच्या उन्नतीसाठी ईश्‍वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करते, त्या बहिणीची हाक ईश्‍वराच्या चरणी पोहोचते. त्यामुळे प्रत्येक साधिकेने त्या दिवशी ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रत्येक युवकाला सद्बुद्धी, शक्‍ती आणि सामर्थ्य मिळण्यासाठी प्रार्थना करावी.

१५. निषेध
नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये इत्यादी संकेत पाळावेत. या दिवशी भूमीखनन करू नये.

..... सौजन्या वरून

No comments:

Post a Comment